फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने मुंबई-पुणे प्रवासात 'ते' तंत्रज्ञान शक्य आहे?

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हायपरलूप प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे. देशातील पहिला मुंबई-पुणे हा मार्ग हायपरलूप या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडला जाण्याबाबत तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. वायूवेगाने धावणाऱ्या या हायपरलूप ट्रेनमधून मुंबई-पुणे प्रवास 600 किलोमीटर प्रति तास या गतीने अवघ्या अर्ध्या तासात होऊ शकतो, असा अंदाज आहे.

Devendra Fadnavis
Mumbai : कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला सीआरझेडचा ग्रीन सिग्नल

फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विविध प्रकल्पांचा उल्लेख करत पुढील पाच वर्षांचा कालखंड हा राज्याच्या पायाभूत विकासावर भर देणारा असेल असे स्पष्ट केले आहे. २०१४ ते २०१९ पर्यंत पाच वर्षांच्या कालखंडात त्यांनी अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम केले आणि ते पूर्णत्वास नेले आहेत. मुंबई-पुणे हा प्रवास सध्या तीन ते चार तासांचा आहे. मात्र हा प्रवास हायपरलूपच्या वायू वेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून फक्त काही मिनिटांवर म्हणजेच २५ मिनिटांवर होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी आपल्या ट्विटरवर हायपरलूपचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या पर्वात हायपरलूपच्या तंत्रज्ञानाला गती देत मुंबई पुण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येईल यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता तो आता प्रत्यक्षात येण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील या प्रकल्पाला गती मिळणार आहे. देशातील पहिला मुंबई-पुणे हा मार्ग हायपरलूप या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडला जाणार आहे. वायूवेगाने धावणाऱ्या या हायपरलूप ट्रेनची गती 1200 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. मात्र मुंबई-पुणे दरम्यान 600 किलोमीटर प्रति तास या वेगाने ती धावणार आहे.

Devendra Fadnavis
Mumbai : मुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार मोठी भेट! BMC ने काय केली घोषणा?

या अत्याधुनिक ट्रेनला कुठेही थांबा नसेल मुंबई ते पुणे असा थेट प्रवास करावा लागेल. या ट्रेनचे तिकीट हे विमान प्रवासाइतके असण्याची शक्यता आहे. हायपरलूप या भारतासाठी नव्या असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात एका पॉडमध्ये 24 ते जास्तीत जास्त 28 प्रवासी बसू शकतात. अमेरिकेमधील लॉस एंजेलिस-सॅन फ्रांसिस्को या दोन शहरादरम्यान न थांबता झटपट प्रवासासाठी ही कल्पना मांडली होती. २०१३ मध्ये एलन मस्क यांनी ही संकल्पना मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पहिल्या पर्वात हायपरलूप या अमेरिकन तंत्रज्ञान आधारित अत्याधुनिक प्रकल्प मुंबई-पुणे मार्गाकरीता सुरू करण्याची घोषणा केली होती. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com