Mumbai: 'या' कामासाठी आता संपूर्ण राज्यात एकाच वेळी टेंडर काढणार

अन्नधान्य वाहतूक, हाताळणुकीसाठीच्या टेंडरबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai): राज्यातील लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्य वाहतूक तसेच अन्नधान्य हाताळणूक (हमाली) या करिता संपूर्ण राज्यात एकाच वेळी टेंडर प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे राज्यातील वितरण प्रणाली सक्षम होणार असून, या व्यवस्थेत सुसूत्रता येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nashik ZP: पालकमंत्री नसल्याचा नाशिक जिल्ह्याला काय बसला फटका?

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याची वाहतूक व शासकीय गोदामामध्ये अन्नधान्याची हाताळणूक यासाठी स्वतंत्ररित्या कंत्राटे निश्चित केली जातात. तथापि आता केंद्र शासनाने अन्नधान्याच्या वाहतूक खर्चात बचतीसाठी रूट ऑप्टीमायझेशन स्टडीनुसार निश्चित केलेल्या मार्गावरून वाहतूक करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्यात अन्नधान्य वाहतूक सुरु करण्यात आली आहे. यात वाहतूक आणि हाताळणूक खर्च केंद्राने निर्धारित केला आहे. यात केंद्र व राज्याचा हिस्सा प्रत्येकी पन्नास टक्के आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Thane: ठाणे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर; उपमुख्यमंत्री शिंदेंनी काय दिले आदेश?

आता नव्या प्रणालीत उपलब्ध अन्नधान्य साठ्यानुसार वेळोवेळी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील गोदामातून उचल करावी लागते. त्यामुळे आता मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील ५ परिमंडळे व ३४ जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी निविदा प्रक्रिया राबवून वाहतूक कंत्राटे निश्चित करण्यामुळे या प्रणालीत सुसूत्रता येणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com