आशियातील सर्वात मोठ्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत काय आली बातमी?

Mumbai BDD Chawl Redevelopment Project: आशियातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प; 1000 एकरवर काम सुरू, 2029 पर्यंत घरांच्या चाव्या देण्याचे नियोजन
BDD Chawl Redevelopment, Mumbai
BDD Chawl Redevelopment, MumbaiTendernama
Published on

मुंबई (Mumbai): आशियातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाला वेग आला असून नायगाव येथे पहिल्या टप्प्यात 864 कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत सुमारे 1000 एकर क्षेत्रात पुनर्विकास सुरू असून 2029 पर्यंत सर्व घरांचे वितरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

BDD Chawl Redevelopment, Mumbai
Nashik: गंगापूररोडला समांतर रस्त्यावर अखेर मुख्यमंत्र्यांचीच फुली

मुंबईतील जुन्या BDD चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला अखेर गती मिळत असून नायगाव येथे पहिल्या टप्प्यातील 864 पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे हा प्रकल्प रखडला होता. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प थेट हाती घेत, सर्वोत्तम कंपन्यांमार्फत त्याची अंमलबजावणी केली.

BDD Chawl Redevelopment, Mumbai
Exclusive: हाफकीनच्या 65 कोटींच्या औषध खरेदीत मोठा 'झोल'! CEO महेश आव्हाड यांची जाता-जाता 'हात की सफाई'

या प्रकल्पाअंतर्गत जुन्या सुमारे 160 चौ.फुटांच्या घरांऐवजी 500 चौ.फुटांचे आधुनिक दोन खोल्यांचे (2BHK) फ्लॅट रहिवाशांना विनामूल्य देण्यात येत आहेत. यामध्ये पार्किंग, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रहिवाशांना आपली घरे विकू नयेत, असे आवाहन करत, 2029 पर्यंत सर्व लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच मुंबईतील इतर पुनर्विकास प्रकल्पांनाही वेग देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

BDD Chawl Redevelopment, Mumbai
Exclusive: बायोमायनिंग की भ्रष्टाचाराचे 'मायनिंग'? कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली गाडला जातोय जनतेचा पैसा!

या प्रकल्पाचा विस्तार नायगाव, वरळी आदी भागांमध्ये होत असून एकूण सुमारे 1000 एकर क्षेत्रावर पुनर्विकासाचे काम सुरू आहे. यामुळे मुंबईच्या नागरी रचनेत मोठा बदल होणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकल्पामुळे सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळत असल्याचे नमूद केले. तसेच गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि योजनांमुळे लाखो नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

BDD Chawl Redevelopment, Mumbai
Exclusive: स्वच्छतेचा 'चकाचक' देखावा अन् 500 कोटींचा कचरा! भिंती रंगल्या, खिसे भरले; पण कचरा कोंडी कायम

जवळजवळ चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा हा सुवर्णक्षण आपल्याला अनुभवता येत आहे. ही घरं म्हणजे केवळ इमारत किंवा सिमेंट-विटांचं बांधकाम नाही, तर ते आपल्या स्वप्नांचं, आशा-आकांक्षांचं प्रतिक असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com