Nagpur: 'या' ऐतिहासिक तलावाची सुरक्षा भिंत बांधण्याचे काम संथगतीने

Nagpur
NagpurTendernama

नागपूर (Nagpur) : सक्करदरा तलावाच्या काठावर सुरक्षा भिंत बांधण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असले तरी ते आजपर्यंत ते पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला 2-3 महिने काम केले गेले, परंतू आता काम बंदच आहे. या कामासाठी एनआयटीने सुमारे 9 कोटींचे टेंडर दिले. संबंधित ठेकेदार आधी बाजूच्या भागावर खड्डे बुजवून काँक्रिटीकरण करत आहे. अशाप्रकारे सक्करदरा तलावाला सुरक्षा भिंत बांधल्यास पाण्याचे कुंड कोरडे होऊ शकते, असे बुद्धिजीवी लोकांचे मत आहे. दोन्ही बाजूंनी लक्ष केंद्रित केल्यानंतर, समोर एक भिंत बनविली जाईल. जून-जुलैमध्ये पावसाळा सुरू होईल. या स्थितीत मे महिन्यापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Nagpur
EXCLUSIVE : 'मनी'संधारण भाग 1; महाराष्ट्रातील अलीबाबा आणि 40...

यंदा शहरासह जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांसह सर्वच धरणे भरली आहेत. जलाशयांचे दरवाजे उघडल्यावर आजूबाजूची गावे तुडुंब भरून गेली, मात्र शहरातील ऐतिहासिक सक्करदरा तलाव भरू शकला नाही. पावसाळ्यात काही प्रमाणात पाणी साचले होते, ते आता हळूहळू कोरडे होत आहे. उन्हाळ्यापूर्वीच तलावाला शेताचे स्वरूप येऊ लागले आहे.

Nagpur
Mumbai : कामाठीपुऱ्यातील रहिवाशांनी काय केली 'म्हाडा'कडे विनंती?

प्रशासकीय दुर्लक्षामुळे सक्करदरा तलाव आपले अस्तित्व वाचवण्यासाठी धडपडत आहे. असे पुरातन तलाव आता शहरात क्वचितच पाहायला मिळतात. मात्र शहरातील तलावांच्या दुर्दशेबाबत प्रशासनाने गांभीर्य दाखवले नाही. तलावात पाणी साचण्याचा कोणताही नैसर्गिक स्रोत नाही. एका बाजूला टाउनशिप, दुसरी बाग आणि रस्ता. त्यामुळेच पावसाचे पाणी नाल्यातून रस्त्यावरून जाते, पावसाचे पाणी तलावात साठवून ठेवण्याचे नियोजन केले तर तलाव वाचू शकतो, अन्यथा अशाच प्रकारे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात तलाव कोरडा पडतो. 

Nagpur
Nagpur : फडणवीसांच्या पीएच्या क्वार्टरमध्ये तब्बल 9.50 लाखांचे एसी

सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष

सक्करदरा तलावाच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आहे, तलावात मूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी आहे, तरीही लोक मूर्ति विसर्जन करतात. सण-उत्सवाच्या काळात त्यावर टिनपत्रेही झाकली जातात. तलावाशेजारी संत तुकाराम गार्डन आहे त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर केला जात असला तरी तलावाच्या सुशोभीकरणासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. बॉलीवूड सेंटर पॉइंटच्या लगतच्या भागातून काही ठिकाणी भिंतही पडू लागली आहे. या भागात सुरक्षा भिंत बांधली जाईल की नाही, याची माहितीही तेथे काम करणाऱ्या लोकांना नाही. तलावात पावसाचे पाणी साचण्याची व्यवस्था करावी, तरच तलावाचे सौंदर्य बहाल होईल, असे कॅम्पसमधील रहिवाशांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com