
पुणे (Pune) : राज्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गावर आणि ‘एमएसआरडीसी’च्या अखत्यारीत असलेल्या पुणे-मुंबई द्रुतगतीवरील प्रवास येत्या १ एप्रिलपासून ३ टक्क्यांनी महागणार आहे. (Mumbai Pune Expressway Toll News)
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दरवर्षी १ एप्रिलला टोलच्या दरात वाढ करते. ही वाढ वाहनांच्या प्रकारानुसार असते. अवजड वाहनांना जास्तीचा टोल द्यावा लागतो. सध्या होणारी वाढ तीन टक्के असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
चारचाकीच्या एकेरी प्रवासावर पाच रुपयांची वाढ झाली असून, परतीचा प्रवास करताना चारचाकींसाठी १० रुपये जास्तीचा दर आकारलेला आहे. अन्य प्रकारच्या वाहनांवर सरासरी १५ ते २० रुपयांची वाढ होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.