मुंबई ते सुरजागड नवा एक्सप्रेस-वे! महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यासाठी काय आहे सरकारचा प्लॅन?

Eknath Shinde: ६० मिनिटांत मुंबई पार होणार! ३३७ किमीचे मेट्रो नेटवर्क आणि २०३० पर्यंत ३५ लाख घरांसाठी नवे धोरण; एमएमआरमध्ये ४ लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प
Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai): 'विकसित भारत २०४७' चे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई ते गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत थेट विकासाचा नवा एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा, दळणवळण, रोजगार निर्मिती आणि उद्योग क्षेत्रातील क्रांतीच्या बळावर राज्य वेगाने पुढे जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde
गुंतवणुकीचे 'नेक्स्ट डेस्टिनेशन' नाशिक! 750 कोटींचे वर्ल्ड ट्रेड सेंटर, 50 कोटींचे आदिवासी क्लस्टर

महाराष्ट्राचा विकास केवळ मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरांपुरता मर्यादित न ठेवता तो थेट गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागांपर्यंत पोहोचवण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 'मुंबई ते सुरजागड - समृद्धीचा महामार्ग' या संकल्पनेतून राज्यामध्ये उद्योग आणि पायाभूत सुविधांचे एक महाकाय जाळे विणले जात आहे. यामुळे मुंबई ते गडचिरोली दरम्यानचा दळणवळणाचा मार्ग आता अधिक वेगवान होणार आहे.

गडचिरोलीत औद्योगिक क्रांती अन् नवीन विमानतळ
गडचिरोली जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कोनसरी येथे लॉयड मेटल्स लिमिटेडच्या माध्यमातून २० हजार कोटींचा 'इंटिग्रेटेड स्टील प्लांट' उभारण्यात येत असून, त्यातून १० हजार रोजगार मिळतील. यासोबतच सुरजागड इस्पातच्या वतीने आणखी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जात आहे. स्थानिक तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी १७० कोटी रुपये खर्चून 'टाटा टेक्नॉलॉजी कौशल्य विकास केंद्र' सुरू करण्यात आले आहे.

Eknath Shinde
मुंबई-नाशिक रेल्वे प्रवासातील 'बँकर' इंजिनचे टेन्शन संपणार; काय आहे नवा प्लॅन?

सुरजागडमधील खनिज वाहतूक सुलभ करण्यासाठी ८५ किलोमीटर लांबीच्या विशेष ग्रीनफिल्ड रस्ते प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. हा मार्ग थेट समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असून, त्यामुळे मुंबई ते गडचिरोली प्रवास अवघ्या ९ ते १० तासांत पूर्ण होईल. याशिवाय गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारणीच्या कामालाही मान्यता देण्यात आली आहे. यासाठीच्या विविध प्रकल्पांच्या टेंडर प्रक्रियांना लवकरच सुरुवात होणार आहे.

मुंबई आणि एमएमआरमध्ये ४ लाख कोटींचे मेगा प्रोजेक्ट्स
मुंबई महानगर प्रदेशाला (MMR) जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी सध्या ४ लाख कोटी रुपयांचे विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो विस्तार, मुंबई-पुणे मिसिंग लिंक आणि वाढवण बंदर यांसारख्या गेमचेंजर प्रकल्पांचा समावेश आहे. '६० मिनिटांची मुंबई' हे लक्ष्य समोर ठेवून एमएमआरमध्ये ३३७ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे.

Eknath Shinde
Nashik: जलवाहिन्या फोडणाऱ्या कंत्राटदारांना दणका; 26 लाख...

गृहनिर्माण क्षेत्रात डिजिटल क्रांती आणि 'झोपडपट्टीमुक्त' मुंबई
मुंबईमध्ये घरांची वाढती गरज लक्षात घेऊन तब्बल १७ वर्षांनंतर नवीन गृहनिर्माण धोरण लागू करण्यात आले आहे. २०३० पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३५ लाख घरे उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित केंद्रीकृत डिजिटल हाऊसिंग पोर्टल विकसित केले जाणार आहे, ज्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांचे टेंडर आणि नियोजन सुटसुटीत होईल.

झोपडपट्ट्यांचे नवे अतिक्रमण रोखण्यासाठी 'नेटराम' (NETRAM) या अत्याधुनिक उपग्रह डेटा आणि जीआयएस मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पात पात्र आणि अपात्र अशा दोन्ही वर्गांतील नागरिकांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
Mumbai: मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा लवकरच होणार कायापालट! काय आहे प्लॅन?

पर्यावरणपूरक विकास आणि हवामान बदल
विकासाची कामे करताना पर्यावरणाचा समतोल राखण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथे २९५ एकरांचे भव्य 'सेंट्रल पार्क' आणि ठाण्यात २५ एकरांचे 'नमो ग्रँड सेंट्रल पार्क' विकसित करण्यात आले आहे. मुंबईतील पूर नियंत्रण आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी 'iFLOWS' प्रणाली, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज आणि मिठी नदी सुधारणा प्रकल्पांना गती देण्यात आली आहे.

Key Points Summary

  • मुंबई ते गडचिरोली (सुरजागड) प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी ८५ किमीचा ग्रीनफिल्ड रस्ता समृद्धी महामार्गाला जोडणार.

  • गडचिरोलीत ३७ हजार कोटींची गुंतवणूक; नवीन विमानतळ आणि स्टील प्लांट उभारणार.

  • मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात ४ लाख कोटींचे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प प्रगतीपथावर.

  • २०३० पर्यंत ३५ लाख घरे उभारण्यासाठी १७ वर्षांनंतर नवे गृहनिर्माण धोरण लागू.

  • नवीन अतिक्रमणे रोखण्यासाठी NETRAM उपग्रह तंत्रज्ञान आणि जीआयएस मॅपिंगचा वापर करणार.

  • महालक्ष्मी रेसकोर्स येथे २९५ एकरांचे देशातील सर्वात मोठे सेंट्रल पार्क उभारणार.

Tendernama
www.tendernama.com