मुंबईत आता प्रत्येक झोपडपट्टीसाठी स्वतंत्र कंत्राटदार; अस्वच्छतेला कंत्राटदारच जबाबदार

BMC
BMCTendernama

मुंबई (Mumbai) : दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात ६० टक्के मुंबईकर झोपडपट्टीत वास्तव्य करतात. आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून झोपडपट्टीच्या स्वच्छतेकडे काहीसे दुर्लक्ष झाले. त्यामुळे झोपडपट्टी कचरामुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

BMC
दावोसमध्ये महाराष्ट्राचे विक्रमी MOU; 2 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा

स्वतंत्र धोरणाअंतर्गत प्रत्येक झोपडपट्टीसाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असून झोपडपट्टीतील कचरा, गटारे, नाल्यात अस्वच्छता निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदार जबाबदार असणार आहे. संपूर्ण स्वच्छ मुंबई अभियानाअंतर्गत आता झोपडपट्टीत कचरा मुक्तीचे उद्धिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. महापालिकेच्या प्रस्तावित धोरणानुसार झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे.

BMC
Mumbai : 'या' महापालिकेचे एसटीपी प्रकल्पासाठी साडेचारशे कोटींचे टेंडर

तसेच झोपडपट्टी वस्तीमधील गल्ल्यांची सफाई, छोट्या गटारांची सफाईसाठीदेखील स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात येईल. ही गटारे वर्षभर अनेक वेळा स्वच्छ करावी लागणार आहेत. झोपडपट्टीनजीक असणाऱ्या छोट्या नाल्यांची स्वच्छता राखणे, पावसाळ्याआधी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वतंत्र कंत्राटदारावर असणार आहे. झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांच्या सफाईची जबाबदारी स्वतंत्र कंत्राटदारावर असेल. दिवसातून दोन ते तीन वेळा या स्वच्छतागृहांची स्वच्छता करावी लागेल. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com