Sambhajinagar : अखेर कमल तलावालगत अतिक्रमणांवर फिरणार बुलडोझर

Sambhajinagar
SambhajinagarTendernama

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणारी एक वास्तू असलेल्या आमखास मैदानाला लागून असलेला ऐतिहासिक कमळ तलावाच्या अतिक्रमण जैसे ठेऊन होत असलेल्या कामावर "टेंडरनामा"ने प्रहार करताच सोमवारी (१ एप्रिल) रोजी महापालिकेतील ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दक्षिण दिशेला असलेल्या अतिक्रमणांची पाहणी केली. दरम्यान सर्वेक्षण केलेल्या सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या असून, संबंधितांना स्वतः हुन अतिक्रमण काढुण घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, अन्यथा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामिर्फत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढले जाईल, अशी तंबी देण्यात आली आहे. याशिवाय कमल तलावाच्या दिशेने असलेल्या दारे-खिडक्या बंद करण्याच्या कडक सुचनाही देण्यात आल्या असल्याचे कार्यकारी अभियंता राजीव संधा यांनी टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Sambhajinagar
Sambhajinagar : आधीच उंच दुभाजक त्यात अनेक ठिकाणी तडे; दुभाजकाला...

कमल तलावाचे विकासकाम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे या ऐतिहासिक तलावाचे भाग्य उजळणार आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने अमृत - २ .० या योजनेतून दोन कोटी ७८ लाख रुपये मंजूर केले आहेत. यात केंद्र सरकारचा २५, राज्य सरकारचा ४५ व महापालिकेचा ३० टक्के निधी उपलब्ध झाला आहे. या तलावाच्या पुनरुज्जीवन व संवर्धनासाठी गुरूवार (ता. २२ जून) महानगरपालिकेच्या जलनि:सारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत तब्बल २ कोटी ३० लाख २६ हजार २०२ रुपयांचे टेंडर प्रसिध्द करण्यात आले होते. १० जुलै २०२३ या तारखेपर्यंत इच्छुक ठेकेदारांना टेंडर भरण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. यात १७.७५ इतक्या कमी टक्के दराने टेंडर भरल्याने छत्रपती संभाजीनगर येथील मुजीब कंन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम देण्यात आले आहे.कंपनीमार्फत गत सहा महिन्यांपासून काम सुरू असून अद्यापपर्यंत ५० टक्के गाळ उपसण्यात आला आहे. सदर गाळाचेही महानगरपालिकेने चांगले नियोजन केले असून, शहरातील हरितपट्टे आणि उद्यानांमध्ये वृक्षलागवडीसाठी त्याचा उपयोग केला जात आहे.

Sambhajinagar
Sambhajinagar : शिवाजीनगर भुयारी मार्गात जीव्हीपीआरचे वराती मागून घोडे; महापालिका, मजीप्राचा...

कमल तलावातील संपुर्ण गाळ व जलपर्णी काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. यानंतर आता " टेंडरनामा " ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर त्याची दखल घेत महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत, शहर अभियंता ए.बी.देशमुख यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता राजीव संधा, उप अभियंता अनिल तनपुरे, कनिष्ठ अभियंता तेजल तायडे, महेश पालवे, काझी जावेद यांनी गत सोमवारी कंत्राटदार शेख मुजीब यांच्यासह गुलाबवाडी , आनंदनगरकडून उत्तर - दक्षिण सुरक्षाभिंतीला व फुटपाथच्या बांधकामासाठी अडथळे ठरणार्या अतिक्रमणांचे देखील महानगरपालिकेने सर्वेक्षण केले असून तलावाच्या उत्तर - दक्षिण दिशेने असलेली अतिक्रमणे हटवून सदर मालमत्ताची तलावाच्या दिशेने अनधिकृतपणे कोरलेली दारे - खिडक्या बंद करण्याच्या हालचाली महानगरपालिकेने सुरु केल्या आहेत.

दरम्यान महानगरपालिकेने टाऊन हाॅल क्षय रूग्णालय ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मार्ग ते आसेफिया काॅलनीकडे जातार्या रस्त्याचे सिमेंटीकरण केले. रस्त्याच्या मधोमध दुभाजक देखील टाकला, मात्र सहा महिन्यांपासून कंत्राटदाराने दुभाजकाची रंगरंगोटी केली नाही. दुभाजकात झाडाफुलांसाठी व्यवस्था केली नाही. ही दोन्ही कामे केली असती, तर तलावाच्या सौंदर्यात भर पडली असती. महानगरपालिकेने तलाव विकसित करताना टाऊन हॉल ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत तार फेंसींग केली जाणार आहे. तलावाच्या चारही बाजुने भारतीय वंशाची झाडे लाऊन मोठा ऑक्सीजन हब उभारला जाणार आहे. तलावाच्या चौफेर आकर्षक पॅथवे , सुशोभिकरण आणि विद्युतरोषणाई केली जाणार आहे. ऐतिहासिक काळाप्रमाणेच तलावात विविध प्रजातीचे कमळ फुलवले जाणार आहेत. याशिवाय सुरक्षा रक्षकांसाठी निवासस्थान, कॅबीन, बालोद्यान व नानानानी पार्कचा देखील समावेश आहे.
यामुळे हा ऐतिहासिक कमल तलाव छत्रपती संभाजीनगरसह  देशविदेशच्या पर्यटकांचे आकर्षण ठिकाण होणार आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून विकासाला चालना मिळणार आहे.'टेंडरनामा'च्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय , तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी तलावालगत असलेले सर्व अतिक्रमण काढून त्यानंतर घरातील कचरा या तलावात कोणी टाकू नये, अशी समज देत कमळ तलावातील कचऱ्याचे ढिग उचलण्यात आले होते. मात्र महानगरपालिकेच्या कारभार्यांनी अतिक्रमणांकडे डोळे झाक करत तलाव विकसित करण्याचे काम सुरू केले होते. यावर " टेंडरनामा" ने प्रहार करताच आता अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासकांनी पाऊलं उचलली आहेत. येत्या काही महिन्यात कमळाची फूले फुलणार असल्याने तलावातून या फुलांचा सुगंध दरवळणार आहे. पक्क्या घरांचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याने ७ एकरांत तलावाचे पुरुज्जीवन व संवर्धन केले जाणार आहे.  

Sambhajinagar
Mumbai Metro : मुंबईकरांसाठी Good News! महिनाअखेरीस सुरू होणार मेट्रोची Aqua Line

टेंडरनामाच्या वृत्तानंतर विकासाचा मार्ग मोकळा 

'टेंडरनामा'च्या वृत्तमालिकेचा आधार घेत राष्ट्रीय हरित लवादकडे (National Green Tribunal) एका पर्यावरणवादी मित्राने कमल तलावाच्या दुरावस्थेबाबत तक्रार केली होती. त्यानंतर  ट्रिब्युनलने महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली होती. त्यानंतर महापालिका, जिल्हाप्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यानंतर या ऐतिहासिक कमळ तलावाचे गत सौंदर्य पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी तत्कालीन  महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांण्डेय यांना विकास आराखडा तयार करावयाचे निर्देश दिले होते.

आता असे होऊ नये...

यापूर्वी १९९६-९७च्या दरम्यान माजी नगरसेवक गौतम खरात यांच्या मागणीनंतर तत्कालीन महापालिका आयुक्त कृष्णा भोगे यांनी ७ कोटीचे टेंडर काढून चार ठेकेदारांमार्फत कमल तलावाला लागून असलेल्या आमखास मैदानाला सुरक्षा भिंत, अण्णाभाऊ साठे मुलांचे वसतिगृह, व्हीआयपी रोड ते आसेफिया, हिलाल, जलाल ते दिलरस काॅलनीकडे जाणाऱ्या विकास आराखड्यातील पक्का रस्ता आणि त्याच काळात तलावाच्या उत्तरेला टेकडीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान फुलवले होते. तलावाच्या काठावर पश्चिमेला वसलेल्या आनंदनगर, आसेफिया काॅलनी, गुलाबवाडी, जयभिमनगर येथील अतिक्रमण काढून या वसाहतींच्या पाठीमागे सुरक्षाभिंतीचे काम करण्यात आले होते. एवढेच नव्हेतर तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्यात आले होते. तलावाच्या चारही बाजुंनी दगडांची पिचिंग करण्यात आली होती. तलावाच्या पूर्वेला मुरुमाचा भराव टाकून चारही बाजूने वृक्षारोपण करून तेथे दिव्यांग व्यक्ती आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी फूड प्लाझाची देखील निर्मिती केली होती. मात्र नेहमीप्रमाणे महापालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचा या विकासकामांना चांगलाच फटका बसला.विकासकामांची सुरक्षा रामभरोसे असल्याने केलेली विकासकामे होत्याची नव्हती झाली. अडीच दशकानंतर पुन्हा जैसे थे झाले. आता जवळपास अडीच कोटी केवळ तलावावर खर्च केले जात आहेत. मात्र  जनतेच्या या पैशाचा चुराडा होऊ नये, यासाठी आधी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा बंदोबस्त करावा. 

शहरातील पर्यटनात भर पडणार  

आता पुनरुज्जीवन व संवर्धन मोहिमेत कमळ तलावाला आणि परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अजून काही अतिक्रमणे कचरा, जलपर्णी आणि गाळ काढला जाणार असल्याने लवकरच हा ओसाड कमळ तलाव मोठे पर्यटन केंद्र ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com