Jalyukt Shivar 2.0
Jalyukt Shivar 2.0 Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Good News: Nashik जिल्ह्यातील 231 गावांचे नशिब पालटणार; कारण...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार २.० (Jalyukt Shivar 2.0) योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील २३१ गावांची निवड करण्यात आली असून, आता या सर्व गावांचे जलआराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यापर्यंत तालुका पातळीवर हे आराखडे मंजूर करून ते जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले जाऊन त्यानंतर या सर्व आराखड्यांना राज्य सरकारची मंजुरी घेऊन कामे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

राज्य सरकारने २०१५ ते २०१९ या काळात जलयुक्त शिवार योजनेतून २२ हजार ५९३ गावांमध्ये मृद व जलसंधारणाची ६ लाख ३२ हजार ८९६ कामे करून २० हजार ५४४ गावे जलपरिपूर्ण केली आहेत. या योजनेतून २७ लाख टीएसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण करण्यात आल्या. सरकारने पुन्हा जलयुक्त शिवाय अभियान २.० ही योजना पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यात गावातील पाण्याचा ताळेबंद करून त्यानुसार मृद व जलसंधारण, पाण्याचा शाश्‍वत स्त्रोत उपलब्ध करणे, पाण्याचा अतिवापर झालेल्या भागात भूजल पातळी वाढवणे ही कामे केली जाणार आहेत. यासाठी भूजल पातळी व अवर्षणग्रस्त भाग या निकषांवर गावांची निवड केली जाणार आहे.

नवीन योजनेनुसार प्रत्येक गावाचा जलआराखडा तयार करून त्यानुसार गावात पाणलोट विकास करणे, जलसंधारण करणे, अपधाव रोखणे आदी कामे केली जाणार आहेत. तसेच पाणी साठवण्यासाठी शेततळे उभारणे, प्लॅस्टिक अस्तरीकरण करून पाणी साठवणे, सूक्ष्मसिंचन, मूलस्थानी जलसंधारण, सामूहिक पद्धतीने समन्याय तत्वाने सिंचन व्यवस्था करणे, पाणी साठवलेल्या प्रकल्पांवर शेतकऱ्यांच्या सहभागातून सिंचन व्यवस्थापन करणे आदी कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

नव्या योजनेतून जलसाक्षरतेला प्राधान्य दिले जाणार आहे. या जलसाक्षरतेमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. विभागीय आयुक्तांनी सर्व संबंधित कार्यकारी अभियंता तसेच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र देऊन जलयुक्त शिवार २.० योजनेसाठी गावांची निवड करण्याचे आदेश दिले होते. तसेच जलयुक्त शिवार २.० या योजनेत प्रामुख्याने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व अटल भूजल योजनांमध्ये निवड झालेल्या गावांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे नाशिक जिल्हयातील २३१ गावांची निवड करण्यात आली आहे.

या गावांची शिवारफेरी झाली असून त्यांचे जलआराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे. आठवडाभरात हे आराखडे तयार होऊन मान्यतेसाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले जातील. जलआराखडे तयार करणे व मान्यता देणे यासाठी गावस्तर, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय, अशा तीन समित्या आहेत.

जलयुक्त शिवारसाठी निवड झालेली तालुकानिहाय गावे...


मालेगाव ( गावे २०) : एरंडगाव, कंधाणे, कजवाडे, चिंचवे गा, ज्वार्डी खु., ज्वार्डी बु., वळवाडे, गारेगाव, झाडी, नागझरी, पोहाणे, रामपुरा, व-हाणे, सावकारवाडी, हताणे निमशेवाडी, मोरदर, वळवाडी. खाकुर्डी, टिपे
..
नांदगाव (गावे १२) : धोटाणे बुद्रुक, नांदूर, लोंढरे, रोहिले बुद्रुक, डॉक्टरवाडी, गणेशनगर, पिंप्राळे, वाखारी, धनेर, भार्डी, चांदोरे, मनमाड.
..
चांदवड ( २१) : इंद्रायवाडी, शिवाजीनगर, वाहेगावसाळ, कोकणखेडे, रापली, वागदर्डी, पिंपळद, तळवाडे, निमगव्हाण, वडनेरभैरव, शिवरे, बोराळे, दुधखेड, चिखलांबे, धोंडगव्हाण, धोतरखेडे, नवापूर, इंदिरानगर, खडकजांब, जैतापूर, भयाळे.
..
येवला ( १६) : आहेरवाडी, एरंडगाव खु., परंडगाव बु., कानडी, कोटमगाव बु., कोटमगाव बु., खैरगव्हाण, गोपाळवाडी, नायगव्हाण, पिंपळखुटे खु., बदापूर, भुलेगाव, मातूलठाण, रायते, लहीत, शिरसगाव लौकी.
..
देवळा (१४) : कापक्षी, कुंभार्डे, गिरणारे, गुंजाळनगर, फुलेमाळवाडी, अऊर, महालपाटणे, माळवाडी, लोहणेर, वरवंडी, विठेवाडी, सटवाईची वाडी, सांगवी, सुभाषनगर.
..
निफाड (१६) : करंजगाव, कसबे सुकेणे, कोकणगाव, कोटमगाव, गोळेगाव, डोंगरगाव, थेरगाव, देवगाव, धारणगाँव खडक, नारायणटेंभी, निमगाव वाकडा, बोकडदरा, वडाळीनजीक, वावी, विंचूर, सारोळे खुर्द
..
सिन्नर (१५) : आशापूर, चापडगाव, सोनेवाडी, कृष्णनगर, कोमलवाडी, खंडागळी, गुरेवाडी, चोंढी, माळेगाव, मेंढी, देवपूर, निऱ्हाळे, पिंपरवाडी, फर्दापूर, वडगाव- सिन्नर, हरसूल.
..
दिंडोरी (१४) : गांडोळे, गोळशी, चिल्हारपाडा, करंजखेड, देहरे, पळसविहीर, मोखनळ, महाजे, श्रीरामनगर, शिंदपाडा, सावरपातळी, बोरवण
जालखेड, कोकणगाव बु., वाघाड.
..
नाशिक (११) : गोविंदपुर, दोणवाडे, नानेगाव, भगूर, राहुरी, लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, शेवगेदारणा, संसारी, बेलतगव्हाण
..
पेठ (१५) : आमडोंगरा, केळविहीर, खडकी, गावंध, डोंगरशेत, धुळघाट, फणसपाडा खु., बोरधा, रायतळे, लव्हाळी, शेवखंडी, सादरपाडा (रा.), होमपाडा डोल्हारमाळ, चोखमुख
..
बागलाण ( १७) : जाखोड, जैतापूर, जोरण, नरकोळ, जुनीशेमळी, पठावेदिगर, भुयाणे, मानूर, वाडीचौल्हेर, बोढरी, चिराई, बहिराणे, वरचे टेंभे, खालचे टेंभे, ईजमाने, मालेगाव भामेर, बिजोरसे.
..
कळवण (१५) : बगडू, भेंडी, भुसणी, बिजोरे, दयाणेदिगर, दरेगाव- हतगड, देसराणे, इंशी, मोकभणगी, नाळीद, नांदुरी, नवीबेज, पिंपळ बु., सावरपाडा,,
सुळे, विसापूर,
..
सुरगाणा (१५) : अंबाठा, अंबोदे, चिंचपाडा, दोडीचापाडा, गोंदुणे, हट्टी बु., हेमाडपाडा, मांधा, मनखेड, पायरपाडा, पिंपळचोंड, रगतविहीर, राहुडे, उंबरपाडा,
वांजूळपाडा, वाघाडपाडा
..
इगतपुरी (१५) : अडसुरे बु., बाहुली खु., भंडारदरवाडी, भरवीर खु., बॉबलेवाडी, धारणगाव, घोडेवाडी, चिचलखैरे, माणिकखांब आंदोळी, सातुरली, टाकेद बु... शेवगेडांग, सोनोशी, . बारशिंगवे,
..
त्र्यंबकेश्वर (१५) : बेहेडपाडा, दापूर. धाडोशी, हातलोंडी, कास, खंबाळे, खरोली, कोटांबी हरसूल,, हुंब्याची मेट, मेटघर किल्ला, मुळवड, नांदगाव, राजीवनगर, सापगाव, शिंदपाडा