'मिठी'चा ओव्हरफ्लो रोखण्यासाठी १६०० कोटींचा ऍक्शन प्लान

Mithi River
Mithi RiverTendernama

मुंबई (Mumbai) : मिठी नदी (Mithi River) ओव्हर फ्लो झाल्यानंतर नदी परिसर जलमय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने मिठी नदीच्या ८ किलोमीटर परिसरात सुरक्षित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. समुद्राचे पाणी मिठी नदीत येते, अशा २८ ठिकाणी हे दरवाजे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी १,६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून भारतातील पहिले तंत्रज्ञान मिठी नदीच्या परिसरात दरवाजे बसवण्यासाठी वापरले जाणार आहे.

Mithi River
गडकरींच्या दाव्याला तडा; ४५० कोटींच्या रस्त्याला भेगाच भेगा

२६ जुलै २००५ ला मिठी नदीने रौद्र रूप धारण केल्याने मुंबईत जलप्रलय आला होता. यात मोठी जिवितहानी झाली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर मिठी नदीने अनेकवेळा धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने ऍक्शन प्लान तयार केला आहे.

Mithi River
'समृद्धी'वर वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी तब्बल 'इतके' कोटी खर्च

मुंबईच्या पश्चिम उपनगरातून उगम पावणारी मिठी नदी बांद्रा बिकेसी कुर्लापर्यंत येते. या विभागात अतिक्रमणामुळे मिठी नदीची रुंदी व लांबी कमी होत गेली. त्यामुळे पिण्यायोग्य असलेल्या मिठी नदीचे अस्तित्व धोक्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदी ओव्हर फ्लो झाली की परिसरातील नागरिकांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे लागते. मुंबईत मोठा पाऊस पडला की मिठी नदी परिसरात दरवर्षी एनडीआरएफला पाचारण करून बचाव मोहीम राबवावी लागते. मिठी नदी ओव्हर फ्लो झाल्यानंतर नदी परिसर जलमय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने मिठी नदीच्या ८ किलोमीटर परिसरात सुरक्षित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मिठी नदी परिसरातील २८ ठिकाणी सुरक्षित दरवाजे बसवण्यात येणार असून यासाठी १,६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मुंबईतील पुराचे संकट टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने ऍक्शन प्लॅन तयार केल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

Mithi River
EXCLUSIVE: हाफकिनकडून ५२ कोटींच्या लस खरेदी टेंडरमध्ये अनियमितता

पावसाला सुरुवात झाल्यानंतर मिठी नदी परिसरात २८ ठिकाणी बसवलेले दरवाजे बंद करण्यात येतील. यामुळे नदीतील पाणी नदी शेजारील नाल्यात येणार नाही आणि परिसरातील नागरिकांना पुराचा तडाखा बसणार नाही. हाय टाईड असताना पावसाला सुरुवात झाली की दरवाजे बंद करण्यात येतील. यामुळे नदीतील पाणी नदीतच राहिल. हाय टाईड ओसरली की नदी शेजारील नाल्यातील पाणी पंपाद्वारे मिठी नदीत सोडण्यात येईल, असे वेलरासू यांनी सांगितले. समुद्राचे पाणी मिठी नदीत येते, अशा मिठी नदी परिसरातील २८ ठिकाणी हे दरवाजे बसवण्यात येणार आहेत. भारतात प्रथमच मुंबईत अशा प्रकारे मिठी नदीच्या ८ किलोमीटर परिसरात सुरक्षित दरवाजे बसवण्यात येणार आहेत.

Mithi River
मुंबई महापालिका १०० रुग्णालयांचे रुपडे पालटणार; नेमणार सल्लागार

मुंबईचे व्यवस्थापन करणाऱ्या महापालिकेने नद्यांचे रुंदीकरण, खोलीकरण केले. ब्रिमस्टोव्हेड प्रकल्प, पम्पिंग स्टेशन बांधले. तरीही अनेकवेळा मुंबईची तुंबई झाली. मात्र त्यावेळी समुद्राला मोठी भरती नसल्याने मुंबईकरांवर २६ जुलैसारखी परिस्थिती ओढवली नाही. महापालिकेने सहा पम्पिंग स्टेशन उभारली असली तरी गेल्या १४ वर्षात मोगरा व माहुल पंपिंग स्टेशनचे काम मार्गी लावता आलेले नाही.पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक बंद पडते. नागरिकांच्या घरात पाणी शिरते. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून मुंबईमध्ये साचणारे पावसाचे पाणी समुद्रात सोडता यावे म्हणून नाल्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय 1993 मध्ये पालिकेने घेतला. हा प्रकल्प "ब्रिमस्टोव्हेड" प्रकल्प म्हणून ओळखला जातो. 26 जुलै 2005 ला मुंबईत पावसाने हाहाकार उडवला होता. याची दखल घेत पालिकेने हा प्रकल्प गतीने राबवण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये "ब्रिमटोव्हेड" प्रकल्प राबवण्यास सुरुवात करण्यात आली त्यावेळी या प्रकल्पाची किंमत 1200 कोटी रुपये होती. या प्रकल्पाची किंमत आता तिप्पट झाली आहे. तरी महापालिकेला हा प्रकल्प अद्याप पूर्ण करता आलेला नाही.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com