Mumbai BEST: 'बेस्ट'च्या ताफ्याचा होणार कायापालट! लवकरच दाखल होणार 3200 बसगाड्या

Mumbai BEST
Mumbai BESTTendernama

मुंबई (Mumbai) : प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमातील संपूर्ण बसताफा हा २०२७ पर्यंत इलेक्ट्रिकवर करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच बेस्ट उपक्रमामार्फत सद्य:स्थितीत २१०० एकमजली व ९०० दुमजली इलेक्ट्रिक तसेच २०० एकमजली सीएनजी अशा एकूण ३२०० बसगाड्यांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी नुकत्याच संपलेल्या विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत दिली.

Mumbai BEST
Nagpur : नवीन नागपूरचा जानेवारीत फुटणार नारळ? 750 कोटींच्या कामांचा 'असा' आहे प्लॅन

बेस्ट बससेवेसंदर्भात सदस्य सुनिल शिंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना सामंत बोलत होते.

मंत्री सामंत म्हणाले की, बेस्ट उपक्रमामार्फत सद्य:स्थितीत २१०० एकमजली व ९०० दुमजली इलेक्ट्रिक तसेच २०० एकमजली सीएनजी अशा एकूण ३२०० बसगाड्यांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत ३५ दुमजली व ४५ एकमजली अशा एकूण ८० बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात समाविष्ट झाल्या आहेत.
           
मुंबईतील वाढत्या वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणण्याकरिता बेस्ट उपक्रमामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने ९ जुलै, २०१९ पासून प्रवास भाड्याचे सूसुत्रीकरण करण्यात आले. या सुसूत्रीकरणादरम्यान वाढते प्रदूषण कमी करणे व खाजगी वाहनांचा वापर कमी करण्यास लोकांना प्रवृत्त करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या सर्वसाधारण बस सेवेवर पूर्वी आकारण्यात येत असलेले कमीत कमी प्रवासभाडे ८ रुपयांवरुन ५ रुपये व वातानुकूलित बस सेवांकरिता आकारण्यात येत असलेले कमीत कमी प्रवासभाडे २० रुपयांवरून ६ रुपये करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत बेस्ट उपक्रमाचे मासिक उत्पन्न ६० कोटी असून, मासिक खर्च २४० कोटी इतका आहे. १८० कोटी इतका मासिक तोट्याची रक्कम बेस्ट उपक्रमास बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अनुदान स्वरुपात प्राप्त होत आहे.

Mumbai BEST
Nagpur Metro: नागपुरात मेट्रोची धाव आता 83 किलोमीटर पर्यंत! 6 हजार 708 कोटींची तरतूद

पूर्वी बेस्ट उपक्रमामार्फत पुरविण्यात येत असलेल्या विद्युत पुरवठा दरपत्रकाची निश्चिती बेस्ट समितीमार्फत करण्यात येत होती, त्यावेळी बेस्ट परिवहन विभागाच्या तोट्याचे समायोजन विद्युत पुरवठा विभागाच्या अतिरिक्त महसूलातून करण्यात येत होती. परंतु विद्युत अधिनियम २००३ अस्तित्वात आल्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या विद्युत दराचे नियंत्रण महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे गेल्यामुळे वीज दर ठरविण्याचे अधिकार बेस्ट उपक्रमाकडे राहिलेले नाहीत. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या महसुलावर मर्यादा आल्या. तसेच बेस्ट परिवहन विभागाच्या तोट्याचे समायोजन करण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या एकूण संचित तोट्यात वाढ होऊ लागली असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
           
बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसेसचा खर्च प्रति किलोमीटर १९३.६४ रुपये इतका असून, भाडेतत्वावरील बसेसचा खर्च प्रति किलोमीटर १२० रुपये असा असल्यामुळे स्वमालकीपेक्षा भाड्याच्या गाड्यांची संख्या वाढविण्यावर बेस्ट उपक्रमामार्फत भर देण्यात आला असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी सदस्य सचिन अहिर, विलास पोतनीस यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com