Aurangabad: मनपा सेवांच्या तक्रारींसाठी फक्त एक फोन करा!

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : महानगर पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या मूलभूत सेवा-सुविधांच्या संदर्भातील प्रश्न, अडचणी, समस्या, तक्रारी आदींची जलद गतीने सोडवणूक करण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटीतर्फे नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. या हेल्पलाईनवर नागरिक महानगर पालिकेशी संबंधित स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे आदींबाबतचे प्रश्न, समस्या, तक्रारी किंवा मदतीसाठी संपर्क करू शकतील. नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे स्मार्ट सिटीकडून सांगण्यात आले. जून महिन्याच्या अखेरीस ही हेल्पलाईन सुरू होणार असून, ती आठही दिवस आणि २४ तास सुरू राहणार आहे. (Aurangabad Smart City 24X7 Helpline)

Aurangabad
औरंगाबादेत आधुनिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल 2023 पर्यंत उभारणार

औरंगाबाद स्मार्ट सिटीने नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ई गव्हर्नन्स प्रकल्प घेतला आहे. या प्रकल्पाद्वारे सेवेचा अधिकार अधिनियमाच्या अंतर्गत मनपा संबधित सर्व सेवा नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कार्यक्षमरित्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हा उपक्रम स्मार्ट सिटीच्या ई गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात येणार आहे.

यासोबतच नागरिकांना मनपाकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवेंबद्दल काही प्रश्न असतील किंवा मदतची गरज असेल, तर लवकरच स्मार्ट सिटीकडून त्याचसाठी एक हेल्पलाईन नंबर जाहीर केला जाईल, अशी माहिती स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी दिली. या हेल्पलाईन क्रमांकावर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे आदी संबंधित प्रश्न व मदतीसाठी कॉल करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.

Aurangabad
औरंगाबाद : काम अर्धवट सोडून ठेकेदार फरार; वीज चोरीचीही तक्रार

एकदा कॉल केल्यावर मनपा प्रतिनिधी नागरिकांचे प्रश्न किंवा समस्येची ऑनलाइन नोंद करून घेणार आणि लगेच निवारण होत नसेल तर संबधित विभागाचा कर्मचाऱ्याला त्यासाठी नेमण्यात येईल. ठराविक वेळेत निवारण झाले नाही तर समस्या वरिष्ठ अधिकारीकडे जाईल. या हेल्पलाइनचा संचालन स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर करण्यात येईल. या हेल्पलाईनद्वारे मनपा आयुक्तांना लाईव्ह माहिती मिळेल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com