Devendra Fadnavis : फडणवीसांची मोठी घोषणा; राज्यात सुरू होणार सर्क्युलर इकॉनॉमी पार्क?

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama

नागपूर (Nagpur) : राज्यात सर्क्युलक इकॉनॉमी पार्क सुरू केले जाणार असून, त्या माध्यमातून कचऱ्याचे रुपांतर मुल्यवर्धीत घटकांमध्ये केले जाणार आहे. बायोगॅस, कम्पोस्ट, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होतील. त्याचबरोबर या पार्कमुळे प्रदुषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणे सोपे होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज नागपुरात बोलताना सांगितले.

राज्यात नागपुर बरोबरच मुंबई, पुणे आणि कोकणात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क सुरू केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Devendra Fadnavis
Mumbai : 'बेस्ट'चा दणका: अखेर 700 वातानुकूलित डबलडेकर ई-बसेसच्या मार्गातील अडथळा दूर

प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी आज कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. 

Devendra Fadnavis
ग्रामपंचायतींचे ऑनलाईन कामकज ठप्प; 'या' मागणीसाठी सीएससीचे कंत्राटी कर्मचारी संपावर

नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थानांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.

अत्याधुनिक डच तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र त्यात यश आले नाही. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील अडचणी शासन स्तरावरून दूर करीत आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

गेल्या दहा वर्षांत नागपूरचा वेगाने विकास झाला आहे. मात्र, घनकचरा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत व अन्य स्वच्छतेशी संबंधित अभियानात नागपूरची क्रमवारी घसरायची. आता क्रमवारी सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

Devendra Fadnavis
Nashik : सूरत-चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाने काय दिला सल्ला?

शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. देशाच्या एकूण जीडीपी मध्ये 65 टक्के वाटा हा शहरांचा आहे. शहरांचे महत्त्व लक्षात घेता ही शहरे प्रदूषणमुक्त असावी यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी विविध उपाययोजना, प्रकल्प शासन स्तरावरून राबविण्यात येत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपुरासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस, कम्पोस्ट, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून,  मनपाला रॉयल्टी प्राप्त होणार आहेत. प्रदुषणमुक्तीकडे नागपूरचे हे पाऊल असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com