एक किमीच्या रस्त्यावर खर्च केले 18 कोटी अन् त्यात कामही निकृष्ट दर्जाचे

Road
RoadTendernama

वर्धा (Wardha) : हिंगणघाट येथील आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या रस्त्याच्या कामाला आमदार समीर कुणावार यांनी 18 कोटी 70 लाख रुपयांचा विशेष निधी आणून नुकतीच मंजुरी दिली. ठेकेदाराने कामही सुरू केले आहे. मात्र येथे जुन्या खराब झालेल्या रस्त्यावर साहित्य टाकले जात आहे. 18 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सुरुवातीपासूनच नागरिकांनी केला आहे. 

Road
Samruddhi Mahamarg News : विस्तारित 'समृद्धी'च्या कामासाठी बड्या कंपन्यांत स्पर्धा; तब्बल 46 टेंडर्स दाखल

या मार्गावर उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, पंचायत समिती, न्यायाधीशांचा बंगला, उपविभागीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान, पोस्ट ऑफिस, बँक, रुग्णालय आहे. शहरातील नेते, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आपल्या कामासाठी या ठिकाणी येतात मात्र आजपर्यंत कोणीही याकडे लक्ष दिले नाही. तर दुसरीकडे घरातील पाईपलाईन व नाले तुटू नयेत यासाठी येथे राहणारे नागरिक प्रयत्न करत आहेत. 18 कोटी 70 लाख रुपये खर्चून तयार होत असलेल्या या रस्त्याची लांबी 1 किमी आहे. एवढ्या मोठ्या खर्चात पहिल्यांदाच हा सिमेंट रस्ता बांधला जात आहे, त्यामुळे हा रस्ता मजबूत व टिकाऊ असणे गरजेचे आहे. या बांधकामाकडे लक्ष देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असूनही या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मार्गासाठी दोन फुटांपर्यंत खोदकाम करणे आवश्यक होते, मात्र ते करण्यात आले नाही. या बांधकामात अनेक त्रुटी आहेत. या कामासंबंधित माहिती नागरिकांनी संबंधित विभागाला मागितली, मात्र माहिती देण्यात आली नाही. मुख्य अभियंता धामणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कनिष्ठ अभियंता यांच्याकडून माहिती घेण्यास सांगितले. कनिष्ठ अभियंता राऊत यांचे म्हणणे आहे की, वरून कोणतेही आदेश आले नसल्याने रस्त्याचे कामच संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.

Road
Nagpur : स्मार्ट प्रीपेड मीटर्स; वादग्रस्त 'मॉन्टे कार्लो' कंपनीला टेंडर

साहूर-माणिकवाडा रस्त्यावरील धोकादायक खड्डे अपघाताला देत आहेत निमंत्रण :

वार्ताहर आष्टी शहीद तहसीलच्या साहूर-माणिकवाडा रस्त्यावर जामगावजवळ रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याकडे लक्ष देण्याची मागणी सरपंच रोशन मानमोडे यांनी केली आहे. साहूरपासून पूर्व दिशेला माणिकवाडा गाव सहा किमी अंतरावर आहे. या रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. 21 मे रोजी खड्ड्यामुळे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली, यात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. यापूर्वीही या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले असून, त्यामुळे खड्डे बुजवणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com