Pune : आम्हाला हवी कार्यक्षम परिवहन सेवा अन् मुबलक पाणी!

Pune
PuneTendernama

पुणे (Pune) : पुणेकरांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आणि अधिक सुखकर होण्यासाठी शहरातील खासदाराने केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रभावीपणे बाजू मांडावी, धोरणे ठरवावीत आणि आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून आणावा. शहरासाठी पुरेसे पाणी आणि कार्यक्षम, शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची आहे. तसेच शहरातील नैसर्गिक वारसास्थळे म्हणून टेकड्यांचे संवर्धन करण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी व बाजू मांडावी, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे. पुणेकर नागरिकांच्या जाहीरनाम्याचा समावेश राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Pune
Nagpur : 'त्या' बँकेत अडकलेल्या 300 कोटींच्या ठेवींचा मार्ग मोकळा; कोर्टाने काय दिला आदेश?

बालभारती- पौडफाटादरम्यान महापालिकेने रस्ता प्रस्तावित केला आहे. त्याला पर्यावरणप्रेमी नागरिकांनी गेल्यावर्षी १५ एप्रिलला रस्त्यावर उतरून तीव्र विरोध दर्शविला. लोकभावनेची दखल घेऊन महापालिकेने रस्त्याचे काम तूर्त थांबविले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वेताळ टेकडी बचाव कृती समितीने जाहीरनाम्याद्वारे काही उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याचा राजकीय पक्षांनी स्वीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Pune
'त्या' भीतीपोटी 'तिसऱ्या मुंबई'ला विरोध; 25 हजारांहून हरकती

पर्यावरणासाठी उपाययोजना

- बालभारती रस्ता, उच्चक्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गामुळे (एचसीएमटीआर) तीन टेकड्या फोडाव्या लागणार आहेत. तसेच पाषाणमधील पंचवटीपर्यंत जाणारे दोन बोगदे टेकड्या फोडून होणार आहेत. हे तिन्ही प्रकल्प रद्द करणे गरजेचे आहे. कारण, त्यामुळे शहरातील पाणीसाठ्यावर परिणाम होणार असून शुद्ध हवा कमी होऊन तापमान वाढणार आहे.

- शहराच्या भूगर्भात किमान चार टीएमसी पाणीसाठा आहे. त्याच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक रिचार्ज सिस्टिमची वैज्ञानिक पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

- भूजल पुर्नभरणासाठी मोकळ्या सुविधांच्या जागा (ॲमेनिटी स्पेसेस) संरक्षित केल्या पाहिजेत. शहरात ८०० ॲमिनिटी स्पेसेस, २०० उद्याने आहेत. तेथे पावसाच्या पाण्याची साठवण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

- वेताळ टेकडीचे सुमारे ८०० हेक्टर क्षेत्र नैसर्गिक पावसाच्या पाण्याचे पाणलोट क्षेत्र निर्माण करते. तसेच कोथरूड, वेताळ टेकडी, चतुःश्रृंगी, पाषाण, बावधन, विश्रांतवाडी, विमाननगर, धनकवडी, येवलेवाडी येथील डोंगर उतार क्षेत्र भूजल पुनर्भरण क्षेत्र म्हणून संरक्षित करावे.

- शहरात २५० हून अधिक लहान-मोठ्या प्रवाहांचे जाळे आहे. ते पुनरुज्जीवित करणे गरजेचे आहे.

- शहरातील आणि भोवतालच्या टेकड्यांचे संवर्धन गरजेचे, त्यावर हिरवाई टिकविण्यासाठी प्रयत्न हवेत.

- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली पाहिजे.

- मेट्रोचे उपनगरांत विस्तारीकरण हवे. मेट्रो, बस आणि रिक्षा यांच्यात प्रवासासाठी समन्वय हवा.

- पीएमपीच्या ताफ्यात तीन हजार बस हव्यात. सार्वजनिक वाहतुकीचे प्रमाण १०-१२ टक्क्यांवरून वाढवून ३० टक्क्यांपर्यंत व्हावे, यासाठी उपाययोजना हव्यात.

- वेताळ टेकडीचा समावेश राज्य सरकारच्या नैसर्गिक वारसा क्षेत्रात व महापालिकेच्या विकास आराखड्यात करावा.

Pune
Nashik : रोजगार हमीच्या 60:40चे प्रमाण बिघडण्यास जबाबदार कोण? मंत्री की अधिकारी?

शहराच्या पर्यावरणाचे प्रश्न महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारकडे मांडण्यासाठी पुण्यात नेतृत्वाची पोकळी आहे. नव्या खासदाराने ही भूमिका बजावली पाहिजे आणि शहराच्या पर्यावरणाचे संतुलन राखले पाहिजे, अशी नागरिकांची इच्छा आहे. पाणी, शुद्ध हवेसाठी टेकड्या, नद्या, प्रवाह महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावर घाला घालण्यापेक्षा त्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, अशी आमची अपेक्षा आहे.

- सुषमा दाते

हा जाहीरनामा म्हणजे एखाद्या रस्त्याला विरोध नाही तर, संपूर्ण शहराच्या पर्यावरणाचा विचार करून तयार केला आहे. भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यात टेकड्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्यामुळे त्यांचे संवर्धन आवश्यक आहेच. येत्या काही वर्षांत शहरात पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. पुण्याची अवस्था बंगळूरसारखी होऊ नये म्हणून पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.

- प्राजक्ता दिवेकर

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com