Ravindra Chavan : ठाणे, कल्याणमधील रस्ते होणार चकाचक; 18.50 कोटी मंजूर

Ravindra Chavan
Ravindra ChavanTendernama

नागपूर (Nagpur) : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील कल्याण शिळ निळजे (पलावा) ते नारीवली-बाळे-वाकळण-दहिसर हे मार्ग लवकरच क्रॉंकीटीकरण होणार असून यासाठी १८ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यामध्ये करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्री चव्हाण यांनी दिली. या मार्गावरील रस्ते दर्जोन्नत करण्याच्या निर्णय मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यापूर्वीच घेतला आहे.

Ravindra Chavan
Aditya Thackeray : मेगा रस्ते घोटाळ्यातील पाचही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार का?

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतलेल्या दर्जोन्नतीच्या निर्णयामुळे व या रस्त्यांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये १८ कोटी ५० लाख मंजूर झाल्यामुळे याचा फायदा कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना होणार आहे. या परिसरातील नागरिकांना लवकरच दर्जेदार क्रॉकीटीकरणाचे रस्ते मिळणार असून त्यांची गेल्या काही महिन्यांपासूनची ही मागणी पूर्ण झाली आहे. मंत्री चव्हाण यांच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील रस्ते लवकरकच अधिक दर्जेदार व सुस्थितीत होणार आहेत. यामुळे या परिसरातील वाहनचालक व रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आता या रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे.

Ravindra Chavan
Mumbai : बीएमसीच्या 'त्या' महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अखेर 3520 कोटींचे टेंडर; इस्रायली तंत्रज्ञान वापरणार

कल्याण शिळ रोड तसेच निलजे-पलावा हे रोड सध्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका व जिल्हा परिषद यांच्या ताब्यात आहेत. परंतु पुरेश्या निधी अभावी रस्त्याच्या बहुतांश भागांची देखभाल योग्य पध्दतीने होऊ शकत नव्हती. लोढा परिसरातील कासा रिओ व कासा रिओ टाऊनशिप या परिसरातील हजारो रहिवाश्यांना या खराब रस्त्यांचा नाहक त्रास सोसावा लागत होता. पुरेश्या निधी अभावी या रस्त्यांची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्यामुळे हा रस्ता म्हणजे खड्ड्यांचा रस्ता म्हणून ओळखला जायचा. दुरावस्था झालेल्या या रस्त्याचा धोका हा वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात होत होता. रस्ता दर्जोन्नत व सुस्थितीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे या परिसरातील नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. मंत्री चव्हाण यांनी या गंभीर विषयाची दखल घेत विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, यासाठी अधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंत्री चव्हाण यांनी प्रयत्न केले होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com