औरंगाबादचे ऐतिहासिक दरवाजे कायमस्वरूपी रोषणाईने लखलखणार

Aurangabad
AurangabadTendernama

औरंगाबाद (Aurangabad) : स्मार्ट सिटीच्या हेरिटेज संवर्धन प्रकल्पांतर्गत चारशे वर्ष जुन्या ऐतिहासिक दरवाजांचे सुशोभिकरण झाल्यानंतर पर्यटन मूल्य आणि शहराचा अभिमान वाढवण्याच्या उद्दिष्टाने त्यात कायमस्वरूपी दिवे लावण्यात आले असून कायमस्वरूपी ते लखलखणार असल्याचा दावा स्मार्ट सिटीने केला आहे. दिव्यांची तोडफोड वा नुकसान पोहोचवल्यास त्यावर गुन्हा दाखल करायचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत.

Aurangabad
कन्नड : औट्रम घाटात रुंदीकरणाचा 'घाट'; बोगद्याच्या कामाला ब्रेक

औरंगाबादच्या इतिहासात प्रथमच औरंगाबाद स्मार्ट सिटीने आपल्या हेरिटेज संवर्धन प्रकल्पाचा एक भाग म्हणून शहरातील ६ ऐतिहासिक दरवाजे आणि शहागंज क्लॉक टॉवरवर कायमस्वरूपी दर्शनी दिवे बसवले आहेत. या प्रकल्पात ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचा समावेश होता. ऐतिहासिक दरवाज्यांची रोषणाई केवळ शहराच्या सौंदर्यातच भर घालत नाही तर शहराचे पर्यटन मूल्य आणि नागरिकांमध्ये शहरातल्या वारसाबद्दल अभिमान वाढवण्याचा उद्देश आहे. औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त व प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटी हेरिटेज संवर्धन प्रकल्पांतर्गत शहरातील हेरिटेज वास्तूंवर रोषणाई करत आहे.

Aurangabad
ठाण्यातील टेंडरवरून मंत्री चव्हाणांनी प्रशासनाला दिली डेडलाईन, का?

उल्लेखनीय म्हणजे, औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (ए एस सी डी सी एल) वारसा संवर्धन प्रकल्पांतर्गत पैठण गेट, रोशन गेट, कटकट गेट, खिजरी गेट, काला गेट, तटबंदी भिंत सह नौबत गेट, जाफर गेट, बारापुल्ला गेट मेहमूद गेट आणि रंगीन गेट असे 10 ऐतिहासिक दरवाजे आणि निजामकालीन शाहगंज क्लॉक टॉवरचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करत आहे. गेटच्या जीर्णोद्धाराचे काम अंतर्गत हेरिटेज कॉन्झर्व्हेशनिस्ट आणि वास्तुविशारद स्नेहा बक्षी यांनी इंटेकशी सल्लामसलत करून केले. "प्रकल्पाचा एक भाग म्हणून, ४ शतके जुन्या वास्तू, झाडझुडूप, अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आल्या आणि शहराच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आणिनागरिकांमधील शहरातील वारशासाठी अभिमान आणि आपलेपणाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने पारंपारिक पद्धती आणि साहित्य वापरून संवर्धन करण्यात आले आहेत” बक्षी म्हणाले. त्याचप्रमाणे १९०१ ते १९०६ दरम्यान बांधलेल्या शाहगंज क्लॉक टॉवरचेही नूतनीकरण करण्यात आले आणि त्याचे घड्याळही कार्यान्वित करण्यात आले.

Aurangabad
औरंगाबाद मनपात प्रशासकांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी कोण?

आता मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ.चौधरी यांच्या निर्देशानुसार रोषणाईच्या कामाची चाचणी घेण्यात आली असून ऐतिहासिक दरवाजा पैकी ६ दरवाजांवर आणि क्लॉक टॉवरवर कायमस्वरूपी बसवण्यात आले आहेत. इतिहासात असे घडले आहे की ज्या दरवाज्यांमुळे शहराला "सिटी ऑफ गेट्स" अशी ओळख आहे, त्या दरवाजांवर कायमस्वरूपी रोषणाई करण्यात आली आहेत. जयपूर स्थित एजन्सी गीयर्स ला वास्तूंची रोषणाई करण्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे नेमण्यात आले. ही एजन्सी यापूर्वी ग्वालियर स्मार्ट सिटी आणि इतर शहरांमध्येही कार्यरत आहे. ६ ऐतिहासिक दरवाजे आणि शाहगंज क्लॉक टॉवरवर रोषणाई पूर्ण झाली आहे. "लाइटिंग कॉन्ट्रॅक्टमध्ये 1 वर्षाची वॉरंटी आणि ४ वर्षांची देखभाल समाविष्ट आहे," बक्षी म्हणाल्या. नागरिकांनी दिवाबत्ती सुरक्षित राहावी यासाठी जबाबदार राहण्याचे आवाहन आयुक्त व प्रशासकांनी केले आहे. दिवे किंवा हेरिटेज वास्तूंचे नुकसान करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी बजावले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com