Shaktipith Mahamarg: परभणीतील 20 गावांतून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध; भूसंपादनावर काय काढणार तोडगा?

20 गावांतील शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्या; मोजणी प्रक्रियेवर तोडगा काढण्याचे संकेत
Shaktipeeth Mahamarg
Shaktipeeth MahamargTendernama
Published on

मुंबई (Mumbai): परभणी जिल्ह्यातील सुमारे 20 गावांतून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन आणि मोजणी प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Shaktipeeth Mahamarg
Exclusive: काळ्या यादीतील कंपनीवर आरोग्य विभागाची मेहेरनजर

परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकार स्तरावर चर्चा सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत परभणी जिल्ह्यातील महामार्ग मार्गावरील भूधारक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. या बैठकीला खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर तसेच महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Shaktipeeth Mahamarg
7 महिन्यांची प्रतीक्षा संपली; मनरेगा मजुरांच्या खात्यात थेट 1409 कोटी जमा होणार

शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून जाणारा महत्त्वाचा प्रकल्प असून त्यासाठी भूसंपादन आणि मोजणी प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया 60 ते 70 टक्के पूर्ण झाली असून वर्धा जिल्ह्यात सुमारे 90 टक्के मोजणी पूर्ण झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमधील जमीन शेतीखाली असल्याने शेतकऱ्यांकडून मोजणी प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी परभणी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे माहिती देत शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत सविस्तर आढावा सादर केला.

Shaktipeeth Mahamarg
Dharashiv District Hospital: धाराशिवसाठी महत्त्वाची बातमी; 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयाबाबत काय दिले निर्देश?

दरम्यान, जेएनपीटी ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या पागोटे ते चौक ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पालाही गती देण्याचे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले. हा 29 किलोमीटर लांबीचा सहा लेनचा महामार्ग रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि खालापूर तालुक्यातील 29 गावांतून जाणार असून या मार्गावर सहा पूल आणि दोन बोगदे उभारले जाणार आहेत.

या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Shaktipeeth Mahamarg
शक्तिपीठ महामार्गविरोधात एल्गार! 12 जिल्ह्यातील शेतकरी देणार विधानभवनावर धडक

Key Points Summary

• शक्तीपीठ महामार्ग परभणी जिल्ह्यातील 20 गावांतून जाणार
• भूसंपादन व मोजणी प्रक्रियेवर शेतकऱ्यांचा विरोध
• लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होणार
• राज्यात महामार्गासाठी 60–70% मोजणी पूर्ण
• वर्धा जिल्ह्यात 90% मोजणी प्रक्रिया पूर्ण
• पागोटे–चौक ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पालाही गती

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com